2 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ..! महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना Mahatma Fule Karj Mafi Yojana

2 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ..! महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना Mahatma Fule Karj Mafi Yojana

Mahatma Fule Karj Mafi Yojana : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी मधील सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नावाची एक योजना सुरू केली आहे.

एप्रिल महिन्याच्या दरम्यान घेतलेल्या शेतकऱ्यांची थकीत अल्पमुदतीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. 2015 मार्च आणि मार्च 2019 ही कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू होते.

हे पण वाचा : Crop Insurance latest update..! या जिल्ह्यात ८ दिवसात पीकविमा जमा करण्याचे आदेश; वाचा सविस्त.

या योजनेत जे शेतकरी दुर्लक्षित आहेत किंवा अल्पभूधारक आहे अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत माफ करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्घटन किंवा पुनर्घटित कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीचे लाभ दिले जातील.

30 सप्टेंबर पर्यंत दोन लाख रुपये पेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची खाती किंवा पुनर्जीवन कर्ज खाती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या योजनेस पात्र ठरणार नाही.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना माहिती Mahatma Fule Karj Mafi Yojana

योजनेचे नाव :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

योजनेची सुरुवात :  महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी.

लाभार्थी :  महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी.

योजनेचा उद्देश :  शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणे.

योजनेची सुरुवात :  21 डिसेंबर 2019.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना Mahatma Fule Karj Mafi Yojana

महाराष्ट्र शासन लवकरच महात्मा ज्योतिबा फुले योजनेची तिसरी यादी जाहीर करणार असून, पहिल्या आणि दुसऱ्या योजनेत ज्या शेतकऱ्यांची नाव आलेले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांची तपासणी करून तिसऱ्या यादीत या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची तिसऱ्या यादीत नावे आली अशा सर्व शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेची यादी पाहण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रा त किंवा आपल्या जवळच्या ग्रामपंचायतला भेट देऊ शकतात.

महाराष्ट्र शासनाने अल्प वअत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने या योजनेचे काम सरकार युद्ध पातळीवर करत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत खालील शेतकरी पात्र राहणार नाही Mahatma Fule Karj Mafi Yojana

जी व्यक्ती मंत्री किंवा महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभा किंवा विधान परिषद अशा विविध संस्थांचे सदस्य म्हणून काम केलेले आहे, अशा व्यक्ती या योजनेस पात्र राहणार नाही.

याव्यतिरिक्त ज्या व्यक्ती बिगर कृषी स्रोतांतून आयकर भरतात, या व्यक्तीही महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी पात्र राहणार नाही. तसेच ज्यांना मासिक पेन्शन 25000 पर्यंत मिळते अशा व्यक्ती सुद्धा योजनेत पात्र राहणार नाही (माजी सैनिक वगळून).

पात्रता निकषांमध्ये पंचवीस हजार रुपये मासिक पेक्षा जास्त कमावणारे ग्रेड 5 चे कर्मचारी वगळून केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी तसेच कर्मचारी यांचाही या समावेश केला आहे.

यामध्ये राज्य सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि अनुदानित संस्थेचे काम करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. जर या व्यक्तींचे मासिक वेतन हे 25000 पेक्षा जास्त असेल तर. जर 25 हजार पेक्षा वेतन कमी असेल तर त्यांना ही योजना लागू होईल.

कर्जमुक्ती साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा Mahatma Fule Karj Mafi Yojana

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी तुम्हाला जवळच्या बँक मध्ये खाते उघडणे गरजेचे आहे, खाते उघडल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पासबुक घेऊन परत बँकेत जावे लागेल.

त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

कृपया लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नाही त्यामुळे लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जवळच्या बँक शी संपर्क साधावा लागेल.

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे राज्य सरकारचे उद्देश आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पैशासाठी आत्महत्या करावी लागणार नाही आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हा या पाठीमागचा उद्देश आहे.

याच अनुषंगाने सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राज्यात चालू आहे, त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपले कर्ज माफ करून घ्यावे.

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Close Visit krushibazarbhav